Posts

उंबर्डेत संयुक्त जयंती महोत्सव जल्लोषात साजरा; महापुरुषांच्या विचारांचा जागर...

Image
राजेश गायकवाड आणि एम. डी. कांबळे यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन; भीमगीतांनी रंगली सांस्कृतिक मैफल पेण | जतिन मोरे       नवोदित सिद्धार्थ मित्र मंडळ आणि माता यशोधरा महिला मंडळ, उंबर्डे बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव तथा १३५ वा भीमोत्सव शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी उंबर्डे बौद्धवाडी (ता. पेण, जि. रायगड) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.       या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने झाली. र. ना. कांबळे व गणपत कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष सुभाष वसंत कांबळे, समितीचे पदाधिकारी, माता यशोधरा महिला मंडळाच्या सदस्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बुद्धविहारात सामुदायिक बुद्धवंदना व सूत्रपठन कार्यक्रम पार पडला. भगवान कांबळे आणि नारायण जोशी यांनी...

भारताच्या सीफूड निर्यातीने रचला नवा विक्रम; ८.४६ अब्ज डॉलरची कमाई

Image
फ्रोझन श्रिंप निर्यातीचे वर्चस्व कायम; अमेरिका आणि चीन भारतीय समुद्री उत्पादनांचे प्रमुख ग्राहक वावोशी | जतिन मोरे : जागतिक बाजारपेठेतील विविध आव्हानांवर मात करत भारताने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सीफूड (समुद्री अन्न) निर्यातीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एमपीईडीए) चे अध्यक्ष पी. जवाहर (आयएएस) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत भारताने १९.७२ लाख मेट्रिक टन सीफूडची निर्यात केली असून त्यातून ₹७३,८९०.४६ कोटी (८.४६ अब्ज अमेरिकन डॉलर) इतके उत्पन्न मिळाले आहे. प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.      भारतीय सीफूड निर्यातीमध्ये फ्रोझन श्रिंप (गोठवलेली कोळंबी) हे सर्वाधिक मागणी असलेले उत्पादन ठरले. या उत्पादनातून एकट्या फ्रोझन श्रिंप ₹४९,०३७.९३ कोटी (५,६२४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर) इतका महसूल मिळाला. एकूण निर्यातीच्या प्रमाणात त्याचा ४०.१९ टक्के तर उत्पन्नात ६६.५२ टक्के हिस्सा राहिला. मागील वर्षाच्या तुलनेत श्रिंप निर्यातीच्या मूल्यात लक्षणीय वाढही नोंदविण्यात आली. आर्थिक वर्षात ए...

वावोशीत (मल्हार नगर) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

Image
मान्यवरांकडून अहिल्याबाईंच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव; समाजहितासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन वावोशी | जतिन मोरे : खालापूर तालुक्यातील वावोशी (मल्हार नगर) येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.         पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा, नामसप्ताह, महाप्रसाद, प्रतिमा पूजन व सत्कार समारंभ तसेच संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, मल्हारराव होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास खालापूर पंचायत समितीच्या सदस्या प्रमिला पाटील, वावोशीचे माजी सरपंच राजू शहासने, शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनंत हिरवे तसेच पत्रकार जतिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनो...

फ्रोझन कोळंबीचा दबदबा कायम...

Image
*भारताची सागरी निर्यात विक्रमी उंचीवर; ७२ हजार कोटींची कमाई* फ्रोझन कोळंबीचा दबदबा कायम; अमेरिका-चीनसह नव्या बाजारपेठांत मोठी झेप... वावोशी | जतिन मोरे       देशाच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऐतिहासिक उच्चांक गाठला असून, एकूण निर्यात मूल्य ७२,३२५.८२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) ने जाहीर केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, या कालावधीत १९.३२ लाख मेट्रिक टन सागरी खाद्यपदार्थांची निर्यात झाली आहे.      या निर्यात वाढीमध्ये गोठवलेल्या (फ्रोझन) कोळंबीचा सर्वाधिक वाटा राहिला असून, फक्त कोळंबीने ४७,९७३.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. एकूण निर्यात उत्पन्नाच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक योगदान देत कोळंबीने या क्षेत्रातील वर्चस्व अधिक मजबूत केले आहे. कोळंबीच्या निर्यातीत परिमाणात ४.६० टक्के तर मूल्याच्या दृष्टीने ६.३५ टक्के वाढ नोंदवली गेली. निर्यात बाजारपेठांमध्ये अमेरिका अव्वल स्थानावर कायम असली तरी तेथील निर्यातीत घट दिसून आली. २.३२ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या आयातीसह अमेरि...

'बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन’ची राज्यस्तरीय बैठक; बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्रासह महत्त्वाचे ठराव मंजूर

Image
'बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन’ची राज्यस्तरीय बैठक; बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्रासह महत्त्वाचे ठराव मंजूर     राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; राज्य व जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर ठाणे | जतिन मोरे      रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीस राज्यातील सुमारे २५ जिल्ह्यांतील प्रतिनिधी व इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान राजाभाऊ कदम यांनी भूषवले. यावेळी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी रमेश धिवारे यांनी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची भूमिका स्पष्ट केली.        रमेश धिवारे यांनी अल्पसंख्याक (मायनॉरिटी) संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ देताना १९३२ च्या गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची केलेली मागणी, ब्रिटिशांनी जाहीर केलेला कम्युनल अवॉर्ड तसेच त्यानंतर झालेला पुणे करार याचा आढावा घेतला. या घडामोडींमुळे अस्पृश्य समाजाला स्वतंत्र अल्पसंख्याक दर्जा मिळू शकला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १९४९ मध्...

बौद्ध समाजाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीची मोठी संधी आहे - राजाभाऊ कदम

Image
“बौद्ध समाजाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीची मोठी संधी आहे.”  - राजाभाऊ कदम ठाणे | जतिन मोरे      रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे पार पडली. या बैठकीस राज्यातील सुमारे २५ जिल्ह्यांतील प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान राजाभाऊ कदम यांनी भूषवले.            यावेळी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी रमेश धिवारे यांनी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची भूमिका स्पष्ट करताना अल्पसंख्याक संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ मांडला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी केलेल्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या मागण्यांचा आढावा घेतला. धर्मांतरित बौद्ध समाजाला १९९२ मध्ये केंद्र सरकारकडून अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळेच संघटनेच्या नावात ‘मायनॉरिटी’ हा शब्द समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत मिशनची केंद्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राजाभाऊ कदम (अध्यक्ष),  ॲड. अरियं बौद्ध (कार्याध्यक्ष), रमेश ...

“नळ कोरडे, प्रशासन झोपेत! बार्डी ग्रामस्थांचा संताप”

Image
“नळ कोरडे, प्रशासन झोपेत! बार्डी ग्रामस्थांचा संताप”     कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह; अनधिकृत जोडण्यांमुळे गैरव्यवहाराची शंका, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा कर्जत | जतिन मोरे : ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली अंतर्गत येणाऱ्या बार्डी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. कर्जत तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेतून बार्डीला पाणीपुरवठा केला जात असला तरी मागील एक ते दीड वर्षांपासून तो पूर्णपणे अनियमित झाला असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत.         चार-चार, पाच-पाच दिवसांनी नळांना पाणी येते. त्यातही पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने एक हंडाभर पाणी भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना याचा मोठा फटका बसत आहे. दैनंदिन गरजांसाठी ग्रामस्थांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत. ग्रामस्थांनी याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिले असून ग्रामसभेतही विषय मांडला आहे. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच पंचायत समिती कर्जत येथ...