पोस्ट्स

वावोशी-परखंदे रस्त्याच्या निकृष्ट दुरुस्तीवर पत्रकारांचा आक्षेप

इमेज
दर्जेदार कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन   अभियंत्याच्या उपस्थितीत व तांत्रिक निकषांचे पालन करूनच रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी वावोशी | जतिन मोरे         खालापूर तालुक्यातील वावोशी–परखंदे धनगरवाडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त तांत्रिक निकषांनुसार व दर्जेदार पद्धतीने भरावेत, तसेच कामाच्या वेळी संबंधित अभियंता किंवा अधिकृत तांत्रिक पर्यवेक्षकाची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक करावी, अशी मागणी छत्तीशी मराठी पत्रकार संघ, खालापूर यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता/शाखा अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.          निवेदनात म्हटले आहे की, वावोशी–परखंदे धनगरवाडी मार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर अपघाताचा धोका दिवसेंद...

पत्रकारितेतील प्रभावी नेतृत्व: रसायनीचे राकेश खराडे आता 'महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष

इमेज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी राकेश खराडे यांची बिनविरोध निवड रसायनी | प्रतिनिधी :        रायगड जिल्ह्यातील रसायनी येथील नामांकित पत्रकार राकेश खराडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार समूहात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी राकेश खराडे यांनी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष ही पदे यशस्वीपणे भूषविली असून संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान देत त्यांनी पुढील वाटचाल केली आहे. कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच मुंबई या जिल्ह्यांचे मुख्य प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी प्रदान केले आहे. निवडीनंतर बोलताना राकेश खराडे म्हणाले की, “महाराष...

पर्यटनाचा आनंद बनला दुःखाचा काळ! सोलनपाडा डॅमवर मुंबईतील तरुणाचा पाण्यात वाहून दुर्दैवी अंत

इमेज
🔸सोलनपाडा डॅम परिसरात पावसाळी पर्यटनादरम्यान तरुणाचा पाण्यात वाहून मृत्यू! 🔸सांडव्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दुर्घटना; मुंबईतील चार मित्रांपैकी एकाचा दुर्दैवी अंत! प्रतिनिधी | कर्जत :        कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅम परिसरात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका २४ वर्षीय तरुणाचा सांडव्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २ ऑगस्ट) दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा येथील चार मित्र पावसाळी पर्यटनासाठी सोलनपाडा येथे आले होते. दुपारी सुमारे १.०० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान हे सर्वजण डॅमच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या खालच्या बाजूस पाण्यात उतरून आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामध्ये अरमान अब्दुल लतीफ (वय २४) हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील यांनी कशेळे आऊटपोस्ट पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे द...

खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल...

इमेज
आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मध्यरात्री एफआयआर; तपासाच्या कक्षेत औषध कंपनीसह आणखी संबंधितांची चौकशी करण्याची मागणी पेण | जतिन मोरे      पेण तालुक्यातील वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तब्बल दीड वर्षांच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर अखेर पेण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६(१) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता मधुकर गजबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खुशबूचे वडील नामदेव ठाकरे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि राजीव गांधी पंचायत राज संघटन यांच्या न्यायासाठीच्या संघर्षाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.      २२ जानेवारी २०२५ रोजी उपचारादरम्यान खुशबू ठाकरे हिचा मृत्यू झाला होता. मृत्यूबाबत संशय व्यक्त करत तिचे वडील नामदेव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायत राज संघटन आणि स्थानिक आदिवासी बांधवांनी विविध निवेदने, आंदोलने तसेच ६ मे २०२५ रोजी तहसील कार्यालय, पेण येथे काढल...

खालापुरात समाजकारणाचा अन् पत्रकारितेचा गौरव!

इमेज
 डॉ. रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचा गौरव; 'खालापूर जनसामान्यांची दिशा'च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन उत्साहात. स्वामी विवेकानंद विद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; समाजाभिमुख पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात खालापूर / जतिन मोरे :         रायगड भूषण तथा महाराष्ट्राची भूमी साप्ताहिकाचे संपादक डॉ. रविंद्र विष्णू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध मान्यवरांच्या सन्मान सोहळ्यासह 'खालापूर जनसामान्यांची दिशा' या नव्या वर्तमानपत्राच्या प्रथम अंकाच्या प्रकाशनाचा सोहळा मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी स्वामी विवेकानंद विद्यालय, खालापूर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोपोली नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुनील पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ उत्तर कोकण किनारपट्टी विभाग, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथील रवींद्र मर्दाने, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. पाटील, ॲड. मिलिंद सुरवकर, ॲड. रमेश पाटील, बँक ऑफ इंडिया, खालापूर शाखेच...

​पाऊस रोखू शकला नाही जनआक्रोश! खालापूरात उपवर्गीकरणाविरोधात आठवले गटाचे रान पेटले

इमेज
🔸उपवर्गीकरणाविरोधात खालापूरात आरपीआय (आठवले)चा एल्गार; मुसळधार पावसात खालापूरात धडकला जनआक्रोश मोर्चा 🔸" समाजात फूट पाडण्याचा डाव हाणून पाडू, अन्यथा आगामी निवडणुकांत भूमिका बदलू" - आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा सरकारवर घणाघात खालापूर / जतिन मोरे        अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित धोरणाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने खालापूर तहसील कार्यालयावर सोमवारी दि. २७ जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला-पुरुष, युवक-युवती तसेच मागासवर्गीय समाजातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले. महाराष्ट्र सरकारच्या उपवर्गीकरणाच्या धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.         आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आणि रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, खालापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत (एस.के.) कांबळे यांच्या नेतृत...

शेकापच्या वर्धापन दिनाला खालापूर सज्ज! दहा हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

इमेज
खालापूरमध्ये शेकापच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी; दहा हजार कार्यकर्त्यांसाठी भव्य सभा मंडप उभारणी अंतिम टप्प्यात खालापूर | जतिन मोरे :           शेतकरी कामगार पक्षाच्या २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी आयोजन समितीसह प्रत्यक्ष सभा स्थळाची पाहणी करून आयोजनाचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या राशी पेट्रोल पंप परिसरात उभारण्यात येत असलेला भव्य सभा मंडप पाहून त्यांनी विविध समित्यांना आवश्यक सूचना दिल्या. आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था करण्यात येत आहे. सभास्थळी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, पत्रकारांसाठी विशेष कक्ष, तसेच एलईडी स्क्रीनद्वारे संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अशी अत्याधुनिक व्यवस्था उभारण्यात येत आहे. कार्यक्रमाचे नियोजन अधिक सुसूत्र आणि शिस्तबद्ध व्हाव...