पोस्ट्स

​खोपोली नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह

इमेज
खोपोली नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह; ओळखीसाठी पोलिसांची नागरिकांना साद खोपोली, दि. २७ (प्रतिनिधी) :        खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहाटवडे येथील रेल्वे ट्रॅकजवळील नदीपात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.      पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास रहाटवडे येथील रेल्वे ट्रॅकलगतच्या नदीपात्रात एक तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच खोपोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपासणीअंती संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.     या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत तरुणाच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे ३० वर्षे, उंची सुमारे ५ फूट, मध्यम बांधा व गोरा वर्ण असून चेहऱ्यावर दाढी आहे. त्याने निळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट परिधान केला होता. मात्र, अद्याप त्याची ओळख ...

ग्रामविकास अधिकारी'विना मोहोपाडा-वासांबे ग्रामपंचायत कोमात

इमेज
ग्रामविकास अधिकारी'विना मोहोपाडा-वासांबे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प; ७५ हजार नागरिकांचे हाल 🔸१५ दिवसांपासून पद रिक्त; दाखले, ज्येष्ठ नागरिकांची कामे आणि विकास निर्णय रखडले – २७ जुलैपर्यंत नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा 🔸ग्रामविकास अधिकाऱ्याच्या रिक्त पदाचा फटका;  मोहोपाडा-वासांबे तील प्रशासन कोमात. 🔸दररोज शेकडो नागरिकांची गैरसोय; २७ जुलैपर्यंत नियुक्तीची मागणी रसायनी | प्रतिनिधी         मोहोपाडा-वासांबे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारीपद गेल्या पंधरा दिवसांपासून रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार अक्षरशः ठप्प झाला आहे. विविध शासकीय दाखले, ज्येष्ठ नागरिकांची प्रलंबित कामे, विद्यार्थ्यांचे शाळेसाठी आवश्यक दाखले, उत्पन्नाचे दाखले तसेच विकासकामांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय रखडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.          दि. ८ जुलै रोजी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांची रायगड जिल्हा परिषदेमार्फत अचानक बदली करण्यात आली. मात्र, त्यांच...

कै.सार्थकच्या स्मृतीत फुलले विद्यार्थ्यांचे चेहरे

इमेज
कै.सार्थकच्या स्मृतीत फुलले विद्यार्थ्यांचे चेहरे ⚫ रसायनीत पत्रकार संघाकडून शैक्षणिक साहित्य, खुर्ची भेट व वृक्षारोपण रसायनी | राहुल जाधव       'विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी आदरांजली असते', याच भावनेतून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कै. सार्थक राकेश खराडे यांच्या ७ व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त शुक्रवार, दि. २४ जुलै २०२५ रोजी रसायनी रेल्वे स्थानकाजवळील कष्टकरीनगर राजिप शाळेमध्ये अत्यंत प्रेरणादायी व समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात कौतुकाचे वातावरण पाहायला मिळाले.      या दिमाखदार व सामाजिक कार्यक्रमाला रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश काशिनाथ खराडे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर शिंदे, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा सदस्य राहुल जाधव, पत्रकार गौतम सोनावणे, पत्रकार अमोल सांगळे, पत्रकार असीम शेख, पत्रकार प्रतिक चाळके आणि अनिल रेपाळे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच तुराडे ग्रामपंचायत सरपंच रंजना गाय...

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अशोक गोतार्णे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

इमेज
पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अशोक गोतार्णे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती आरपीआय (आठवले)च्या रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी अशोक गोतार्णे यांची नियुक्ती खोपोलीतील जिल्हास्तरीय बैठकीत घोषणा; पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी दिली जबाबदारी प्रतिनिधी | जतीन मोरे                   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची महत्त्वपूर्ण रायगड जिल्हास्तरीय बैठक रविवारी (दि. १९ जुलै) खोपोली येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्ते अशोक पांडूरंग गोतार्णे (रा. ठाणेन्हावे, ता. खालापूर) यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र चंद्रकांत गायकवाड यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले.          रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आशीर्वादाने व जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्...

सावरोली-खारपाडा रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी;

इमेज
सावरोली-खारपाडा रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, दुकाने व विजेच्या खांबांचे नुकसान प्रतिनिधी | खालापूर :           खालापूर तालुक्यातील सावरोली-खारपाडा रस्त्यावर कुंभीवली गावाजवळ तब्बल ३५० गॅस सिलेंडर वाहून नेणारा एक ट्रक अचानक पलटी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्दैवी घटना घडलेली नाही. मात्र, ट्रक रस्त्याशेजारी उलटल्याने परिसरातील काही दुकानांचे गाळे, विजेचे पोल आणि पाण्याच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरलेले गॅस सिलेंडर असल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक चावणे येथून पुण्याच्या दिशेने निघाला होता. कुंभीवली गावाजवळ आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्ता सोडून शेजारील खड्ड्यात उलटला. गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटल्याचे समजताच परिसरातील नागरिक धावून आले. या घटनेची गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी तातडी...

कर्तव्यावर असलेल्या पोलिस जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; स्वतः कार चालवत असताना काळाचा घाला.

इमेज
कर्तव्यावर असलेल्या पोलिस जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; स्वतः कार चालवत असताना काळाचा घाला. प्रतिनिधी | कर्जत             कर्जत–मुरबाड महामार्गावरील कळंब–चाहूचीवाडी परिसरात बुधवारी (१५ जुलै) रात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जवान ऋतिक किसन ढोले (वय २६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातावेळी ऋतिक हे स्वतः इको कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अन्य चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक ढोले हे आपल्या चार मित्रांसह इको कारमधून कळंब येथून चाहूचीवाडी येथील आपल्या घरी निघाले होते. रात्रीच्या सुमारास गावाजवळील धोकादायक वळणावर कारवरील त्यांचा ताबा सुटल्याने वाहन भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक रेलिंगवर जाऊन जोरात आदळले. धडक इतकी भीषण होती की कारचा एक भाग हवेत उचलला गेला आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंब पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्म...

प्रियकरासाठी पतीचे तीन तुकडे

इमेज
प्रियकरासाठी पतीचे तीन तुकडे प्रियकरासाठी पतीचे केले तीन तुकडे, तब्बल अकरा महिन्यांनंतर मर्डर मिस्ट्रीचा खुलासा , दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक  प्रतिनिधी | नवी मुंबई :            नवी मुंबईतून एक धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.. प्रियकारसाठी स्वतःच्या पतीचे तीन तुकडे केल्याची धक्कादायक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे.. ऐरोलीत एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. तिने पतीचे तीन तुकडे करत विविध ठिकाणी फेकून दिले होते. तिने तब्बल अकरा महिने मर्डर पचवला होता. मात्र आता अखेर तिचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. सुनिता कुशवाह (40) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर बलीराम सूर्यनाथ कुशवाह (50) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान मयत बलीराम कुशवाह हे ऐरोलीच्या यादव नगर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मात्र सुनिता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी ...