Posts

'बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन’ची राज्यस्तरीय बैठक; बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्रासह महत्त्वाचे ठराव मंजूर

Image
'बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन’ची राज्यस्तरीय बैठक; बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्रासह महत्त्वाचे ठराव मंजूर     राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; राज्य व जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर ठाणे | जतिन मोरे      रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीस राज्यातील सुमारे २५ जिल्ह्यांतील प्रतिनिधी व इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान राजाभाऊ कदम यांनी भूषवले. यावेळी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी रमेश धिवारे यांनी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची भूमिका स्पष्ट केली.        रमेश धिवारे यांनी अल्पसंख्याक (मायनॉरिटी) संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ देताना १९३२ च्या गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची केलेली मागणी, ब्रिटिशांनी जाहीर केलेला कम्युनल अवॉर्ड तसेच त्यानंतर झालेला पुणे करार याचा आढावा घेतला. या घडामोडींमुळे अस्पृश्य समाजाला स्वतंत्र अल्पसंख्याक दर्जा मिळू शकला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १९४९ मध्...

बौद्ध समाजाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीची मोठी संधी आहे - राजाभाऊ कदम

Image
“बौद्ध समाजाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीची मोठी संधी आहे.”  - राजाभाऊ कदम ठाणे | जतिन मोरे      रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे पार पडली. या बैठकीस राज्यातील सुमारे २५ जिल्ह्यांतील प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान राजाभाऊ कदम यांनी भूषवले.            यावेळी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी रमेश धिवारे यांनी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची भूमिका स्पष्ट करताना अल्पसंख्याक संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ मांडला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी केलेल्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या मागण्यांचा आढावा घेतला. धर्मांतरित बौद्ध समाजाला १९९२ मध्ये केंद्र सरकारकडून अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळेच संघटनेच्या नावात ‘मायनॉरिटी’ हा शब्द समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत मिशनची केंद्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राजाभाऊ कदम (अध्यक्ष),  ॲड. अरियं बौद्ध (कार्याध्यक्ष), रमेश ...

“नळ कोरडे, प्रशासन झोपेत! बार्डी ग्रामस्थांचा संताप”

Image
“नळ कोरडे, प्रशासन झोपेत! बार्डी ग्रामस्थांचा संताप”     कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह; अनधिकृत जोडण्यांमुळे गैरव्यवहाराची शंका, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा कर्जत | जतिन मोरे : ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली अंतर्गत येणाऱ्या बार्डी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. कर्जत तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेतून बार्डीला पाणीपुरवठा केला जात असला तरी मागील एक ते दीड वर्षांपासून तो पूर्णपणे अनियमित झाला असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत.         चार-चार, पाच-पाच दिवसांनी नळांना पाणी येते. त्यातही पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने एक हंडाभर पाणी भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना याचा मोठा फटका बसत आहे. दैनंदिन गरजांसाठी ग्रामस्थांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत. ग्रामस्थांनी याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिले असून ग्रामसभेतही विषय मांडला आहे. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच पंचायत समिती कर्जत येथ...

महा.अं.नि.स खोपोली शाखेमार्फत वावोशी श्री. छत्रपती विद्यालयात वैज्ञानिक उपक्रम संपन्न

Image
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेमार्फत वावोशी येथील श्री. छत्रपती विद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान हा उपक्रम संपन्न वावोशी | जतिन मोरे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री. छत्रपती विद्यालय व जुनिअर कॉलेज वावोशी या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या "रमण परिणाम" (Raman Effect) या वैज्ञानिक शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची तरतूद असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत त्यांच्या मनात चिकित्सक वृत्ती, कार्यकारणभावाची समज आणि प्रयोगशीलता विकसित व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.      कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर...

खोपोलीतील आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी अश्वपरीस फाऊंडेशनचे नगरपालिकेत निवेदन

Image
खोपोलीतील आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी अश्वपरीस फाऊंडेशनचे नगरपालिकेत निवेदन      पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज व रस्ते समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्याकडून आश्वासन वावोशी | जतिन मोरे : खोपोली शहरातील विविध आदिवासी वाड्यांमधील प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आज खोपोली नगरपालिकेत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण, वीजपुरवठा, रस्ते व वाहतूक तसेच शासकीय कागदपत्रांबाबतच्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.        निवेदनानुसार, शहरातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव जाणवत असून आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. शाळांची गैरसोय व शैक्षणिक सुविधा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होत आहे. तसेच रस्ते व वाहतुकीची व्यवस्था निकृष्ट असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. काही वाड्यांमध्ये वीजपुरवठा नियमित नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय जातीचा दाखला व इतर शासकीय कागदपत्रे मिळ...

खालापूर पंचायत समितीसमोर आरटीआय फेडरेशनचे बेमुदत साखळी उपोषण सुरू...

Image
खालापूर पंचायत समितीसमोर आरटीआय फेडरेशनचे बेमुदत साखळी उपोषण सुरू...      शासनाच्या आदेशांच्या पायमल्लीचा आरोप; गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वावोशी | जतिन मोरे : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संलग्न आरटीआय फेडरेशन खालापूर यांच्या वतीने सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून पंचायत समिती कार्यालय खालापूर समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालय व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून शासन परिपत्रकांचे (GR) पालन होत नसल्याचा गंभीर आरोप करत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.      उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे लेखी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रमुख मागण्या ? उपोषणकर्त्यांनी प्रशासनासमोर पुढील ठोस मागण्या ठेवल्या आहेत: १. तालुक्यातील सर्व ग्रामसभांचे संपूर्ण वेळ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक ...

खोपोलीत “लाईट ऑफ लाईफ" ट्रस्टच्या पालक मेळाव्यात बुवाबाजी व ‘अंगात येणे’ विषयावर प्रबोधन

Image
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखेचे “लाईट ऑफ लाईफ" ट्रस्टच्या पालक मेळाव्यात बुवाबाजी व ‘अंगात येणे’ विषयावर प्रबोधन” खालापूर | जतिन मोरे :       महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेच्या वतीने ‘लाईट ऑफ लाईफ’ संस्थेच्या पालक मेळाव्यात “बुवाबाजी, अंगात येणे आणि चमत्कारा मागील विज्ञान” या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. समाजात वाढत चाललेल्या तथाकथित आध्यात्मिक बुवाबाजीच्या पार्श्वभूमीवर या विषयाची चिकित्सक मांडणी करण्यात आली.          कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुवाबाजी व आध्यात्मिक बुवाबाजी यामधील फसवणुकीचे स्वरूप स्पष्ट करत काही चर्चित बाबांच्या उदाहरणांच्या माध्यमातून अशा व्यक्ती लोकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण कशाप्रकारे करतात याचे विश्लेषण करण्यात आले. अंधश्रद्धेच्या आडून निर्माण होणारी भीती, श्रद्धेचा गैरवापर आणि भावनिक कमकुवतपणाचा कसा फायदा घेतला जातो यावर प्रकाश टाकण्यात आला. यानंतर “मन” या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. माणसाचे मन नेमके कोठे असते, मन आजारी पडते म्हणजे काय ह...