Posts

'बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन’ची राज्यस्तरीय बैठक; बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्रासह महत्त्वाचे ठराव मंजूर

Image
'बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन’ची राज्यस्तरीय बैठक; बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्रासह महत्त्वाचे ठराव मंजूर     राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; राज्य व जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर ठाणे | जतिन मोरे      रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीस राज्यातील सुमारे २५ जिल्ह्यांतील प्रतिनिधी व इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान राजाभाऊ कदम यांनी भूषवले. यावेळी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी रमेश धिवारे यांनी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची भूमिका स्पष्ट केली.        रमेश धिवारे यांनी अल्पसंख्याक (मायनॉरिटी) संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ देताना १९३२ च्या गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची केलेली मागणी, ब्रिटिशांनी जाहीर केलेला कम्युनल अवॉर्ड तसेच त्यानंतर झालेला पुणे करार याचा आढावा घेतला. या घडामोडींमुळे अस्पृश्य समाजाला स्वतंत्र अल्पसंख्याक दर्जा मिळू शकला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १९४९ मध्...

बौद्ध समाजाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीची मोठी संधी आहे - राजाभाऊ कदम

Image
“बौद्ध समाजाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीची मोठी संधी आहे.”  - राजाभाऊ कदम ठाणे | जतिन मोरे      रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे पार पडली. या बैठकीस राज्यातील सुमारे २५ जिल्ह्यांतील प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान राजाभाऊ कदम यांनी भूषवले.            यावेळी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी रमेश धिवारे यांनी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची भूमिका स्पष्ट करताना अल्पसंख्याक संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ मांडला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी केलेल्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या मागण्यांचा आढावा घेतला. धर्मांतरित बौद्ध समाजाला १९९२ मध्ये केंद्र सरकारकडून अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळेच संघटनेच्या नावात ‘मायनॉरिटी’ हा शब्द समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत मिशनची केंद्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राजाभाऊ कदम (अध्यक्ष),  ॲड. अरियं बौद्ध (कार्याध्यक्ष), रमेश ...

“नळ कोरडे, प्रशासन झोपेत! बार्डी ग्रामस्थांचा संताप”

Image
“नळ कोरडे, प्रशासन झोपेत! बार्डी ग्रामस्थांचा संताप”     कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह; अनधिकृत जोडण्यांमुळे गैरव्यवहाराची शंका, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा कर्जत | जतिन मोरे : ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली अंतर्गत येणाऱ्या बार्डी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. कर्जत तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेतून बार्डीला पाणीपुरवठा केला जात असला तरी मागील एक ते दीड वर्षांपासून तो पूर्णपणे अनियमित झाला असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत.         चार-चार, पाच-पाच दिवसांनी नळांना पाणी येते. त्यातही पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने एक हंडाभर पाणी भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना याचा मोठा फटका बसत आहे. दैनंदिन गरजांसाठी ग्रामस्थांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत. ग्रामस्थांनी याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिले असून ग्रामसभेतही विषय मांडला आहे. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच पंचायत समिती कर्जत येथ...

महा.अं.नि.स खोपोली शाखेमार्फत वावोशी श्री. छत्रपती विद्यालयात वैज्ञानिक उपक्रम संपन्न

Image
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेमार्फत वावोशी येथील श्री. छत्रपती विद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान हा उपक्रम संपन्न वावोशी | जतिन मोरे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री. छत्रपती विद्यालय व जुनिअर कॉलेज वावोशी या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या "रमण परिणाम" (Raman Effect) या वैज्ञानिक शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची तरतूद असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत त्यांच्या मनात चिकित्सक वृत्ती, कार्यकारणभावाची समज आणि प्रयोगशीलता विकसित व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.      कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर...

खोपोलीतील आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी अश्वपरीस फाऊंडेशनचे नगरपालिकेत निवेदन

Image
खोपोलीतील आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी अश्वपरीस फाऊंडेशनचे नगरपालिकेत निवेदन      पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज व रस्ते समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्याकडून आश्वासन वावोशी | जतिन मोरे : खोपोली शहरातील विविध आदिवासी वाड्यांमधील प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आज खोपोली नगरपालिकेत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण, वीजपुरवठा, रस्ते व वाहतूक तसेच शासकीय कागदपत्रांबाबतच्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.        निवेदनानुसार, शहरातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव जाणवत असून आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. शाळांची गैरसोय व शैक्षणिक सुविधा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होत आहे. तसेच रस्ते व वाहतुकीची व्यवस्था निकृष्ट असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. काही वाड्यांमध्ये वीजपुरवठा नियमित नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय जातीचा दाखला व इतर शासकीय कागदपत्रे मिळ...

खालापूर पंचायत समितीसमोर आरटीआय फेडरेशनचे बेमुदत साखळी उपोषण सुरू...

Image
खालापूर पंचायत समितीसमोर आरटीआय फेडरेशनचे बेमुदत साखळी उपोषण सुरू...      शासनाच्या आदेशांच्या पायमल्लीचा आरोप; गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वावोशी | जतिन मोरे : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संलग्न आरटीआय फेडरेशन खालापूर यांच्या वतीने सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून पंचायत समिती कार्यालय खालापूर समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालय व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून शासन परिपत्रकांचे (GR) पालन होत नसल्याचा गंभीर आरोप करत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.      उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे लेखी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रमुख मागण्या ? उपोषणकर्त्यांनी प्रशासनासमोर पुढील ठोस मागण्या ठेवल्या आहेत: १. तालुक्यातील सर्व ग्रामसभांचे संपूर्ण वेळ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक ...

खोपोलीत “लाईट ऑफ लाईफ" ट्रस्टच्या पालक मेळाव्यात बुवाबाजी व ‘अंगात येणे’ विषयावर प्रबोधन

Image
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखेचे “लाईट ऑफ लाईफ" ट्रस्टच्या पालक मेळाव्यात बुवाबाजी व ‘अंगात येणे’ विषयावर प्रबोधन” खालापूर | जतिन मोरे :       महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेच्या वतीने ‘लाईट ऑफ लाईफ’ संस्थेच्या पालक मेळाव्यात “बुवाबाजी, अंगात येणे आणि चमत्कारा मागील विज्ञान” या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. समाजात वाढत चाललेल्या तथाकथित आध्यात्मिक बुवाबाजीच्या पार्श्वभूमीवर या विषयाची चिकित्सक मांडणी करण्यात आली.          कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुवाबाजी व आध्यात्मिक बुवाबाजी यामधील फसवणुकीचे स्वरूप स्पष्ट करत काही चर्चित बाबांच्या उदाहरणांच्या माध्यमातून अशा व्यक्ती लोकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण कशाप्रकारे करतात याचे विश्लेषण करण्यात आले. अंधश्रद्धेच्या आडून निर्माण होणारी भीती, श्रद्धेचा गैरवापर आणि भावनिक कमकुवतपणाचा कसा फायदा घेतला जातो यावर प्रकाश टाकण्यात आला. यानंतर “मन” या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. माणसाचे मन नेमके कोठे असते, मन आजारी पडते म्हणजे काय ह...

​'आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा' येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

Image
​'आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा' येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा ​जांभूळपाडा (प्रतिनिधी): येथील आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा या विद्यालयात आज, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मराठी राजभाषा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव करण्यात आला. ​कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात शिक्षिका सुगंधा जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचा समृद्ध वारसा, तिचा इतिहास आणि साहित्यातील महत्त्व यावर प्रकाश टाकला. "मराठी ही केवळ आपली मातृभाषा नसून ती आपली ओळख आहे," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ​कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: • ​मार्गदर्शन: शिक्षिका सुगंधा जाधव यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. ​• शिक्षकांचा सहभाग: कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक वृंद पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होता. व्यासपीठावरील फलकावर "मराठी दिन" निमित्त सुंदर सजावट करण्यात आली होती. ​•...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिर उत्साहात

Image
अखिल भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिर उत्साहात       माता रमाई जयंतीनिमित्त आयोजन; प्रा. आनंद देवडेकर यांचे कार्यकर्ता आचारसंहितेवर मार्गदर्शन, १५० उपासक - उपासिका उपस्थित वावोशी | जतिन मोरे       रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अखिल भारतीय बौद्ध महासंघ या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने जिल्हा रायगड स्तरावर माता रमाई जयंतीचे औचित्य साधून कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर रसायनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रायगड शाखेचे अध्यक्ष दीपक श्रीधर खाडे होते, तर उद्घाटक म्हणून संस्थापक व राष्ट्रीय महासचिव व्ही.जे.गायकवाड उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पूज्य भंते अधिचित्तो यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले.       या शिबिराची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने झाली. आप्पा साळवे यांनी ध्वजवंदन गीत सादर केले. त्यानंतर आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात...

आजारपणातही नात्यांची ऊब जपणारे नामदेव वाळकू मोरे काळाच्या पडद्याआड

Image
आंबेडकरी विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते; १५ फेब्रुवारीला खोपोलीतील नालंदा बुद्धविहारात शोकसभा व पुण्यानुमोदन वावोशी | जतिन मोरे      वावोशी गावचे सुपुत्र व प्रेमळ, शांत स्वभावामुळे सर्वपरिचित असलेले नामदेव वाळकू मोरे (वय ७४) यांचे ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. १९५२ साली वावोशी येथे सामान्य कुटुंबात जन्मलेले नामदेव मोरे यांनी पुढे वडिलांच्या खोपोली येथील भातगिरणीतील नोकरीमुळे खोपोली येथे वास्तव्यास राहून कष्टमय जीवन जगले. ते खोपोलीतील इलॅविटर कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करून आदर्श कामगार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत त्यांनी तीन मुले व एका मुलीला शिक्षण देऊन त्यांचा उत्तम सांभाळ केला. नामदेव मोरे यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, आपुलकीचा व माणुसकी जपणारा होता. नातेवाईक व मित्रमंडळींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मागील पाच ते सहा वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजारामुळे ते बहुतांश वेळ घरीच असत; मात्र या काळातही त्यांनी फोनद्वारे सर्वांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्य...

शिवसेना–भाजप–आरपीआय महायुती मैदानात; उबाठावर थोरवेंची जोरदार टीका

Image
खालापूरमध्ये महायुतीचा भगवा रणसंग्राम     शिवसेना–भाजप–आरपीआय महायुती मैदानात; उबाठावर थोरवेंची जोरदार टीका – “घड्याळाला निष्ठावंत शिवसैनिक कधीही मतदान करणार नाही” खालापूर | राहुल जाधव  खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) या महायुतीने दमदार शक्तीप्रदर्शन करत निवडणूक रणांगणात उडी घेतली आहे. चारही जिल्हा परिषद जागांपैकी दोन जागांवर भाजप, तर दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार, तसेच पंचायत समितीच्या आठ गणांपैकी पाच भाजप व तीन शिवसेनेचे उमेदवार अशा ठोस बलाबलासह महायुती निवडणूक लढवत असल्याची माहिती कर्जत–खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली.         उमेदवारी अर्ज दाखल करताना संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त जनसमर्थन पाहायला मिळाले असून, यामुळे महायुतीच्या विजयाची पुनरावृत्ती निश्चित असल्याचा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला. “शिवसेना–भाजप ही पारंपरिक युती आहे. खोपोली नगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून ऐतिहासिक विजय मिळवला असून, जिल्हा...

वावोशी भीमनगर येथे महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

Image
वावोशी भीमनगर येथे महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण; टाटा स्टील फाउंडेशनचा पुढाकार वावोशी | जतिन मोरे       टाटा स्टील फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत वावोशी येथील भीमनगर परिसरात महिलांसाठी दोन दिवसीय डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात परिसरातील ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.        महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, शासकीय योजनांचा स्वतःहून लाभ घेता यावा तसेच मोबाईलचा सुरक्षित व परिणामकारक वापर करता यावा, हा प्रशिक्षणाचा उद्देश होता. प्रशिक्षणादरम्यान डिजिलॉकर, मेरा रेशन, ई-आधार, आयुष्यमान भारत योजना यांसह सायबर सुरक्षितता व मोबाईल सेफ्टीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. टाटा स्टील फाउंडेशनच्या फिल्ड कोऑर्डिनेटर करूणा कदम यांनी डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षक रंजना राणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मोबाईल ॲप्सचा वापर समजावून सांगितला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये डिजिटल आत्मविश्वास वाढल्याचे सहभागी महिलांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमाला प्रशिक्षक...

वावोशीचे शर्यतप्रेमी व कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर यांचे निधन

Image
वावोशीचे शर्यतप्रेमी व कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर यांचे निधन; रामनवमी कुस्ती स्पर्धेचे प्रमुख पंच, माजी पैलवान व सामाजिक कार्यकर्त्याला गावाचा भावपूर्ण निरोप वावोशी | जतिन मोरे        वावोशी गावातील बैलशर्यती आणि कुस्तीची आवड जिवंत ठेवणारे, क्रीडासंस्कृतीचे जतन करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर (वय ७९) यांचे २५ डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वावोशीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.           रामनवमीच्या निमित्ताने वावोशी येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या कुस्ती स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यासह विविध भागांतील नामवंत व गाजलेले पैलवान सहभागी होत असत. या कुस्तीच्या आखाड्यात हरिश्चंद्र हातनोलकर हे प्रमुख पंच म्हणून निष्पक्ष व जबाबदारीची भूमिका बजावत असत. त्यांच्या निर्णयांमुळे कुस्ती स्पर्धांना विशेष प्रतिष्ठा लाभली होती. हरिश्चंद्र हातनोलकर हे स्वतः पूर्वीचे पैलवान होते. त्यांनी आपल्या तारुण्यात अनेक कुस्त्यांमध्ये बाजी मारून विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले ह...

१ जानेवारी भीमा-कोरेगाव शौर्यदिन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त मंजुरी

Image
१ जानेवारी भीमा-कोरेगाव शौर्यदिन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त मंजुरी; न्यायालयाच्या अटींचे पालन करण्याचे आवाहन वावोशी | जतिन मोरे      भीमा-कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिन कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२६ रोजी शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन करता येणार आहे.          भीमा-कोरेगाव येथील जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दरवर्षी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान वादी व प्रतिवादी यांच्या वतीने संबंधित वकिलांनी आपापल्या बाजू सविस्तरपणे मांडल्या. या प्रकरणात प्रतिवादी म्हणून भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग स्वतः न्यायालयात उपस्थित होते, तर प्रतिवादींची बाजू ॲड. रुपेश लांजेकर यांनी मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काही सशर्त अटी घालून भीमा-कोरेगाव शौर्य...

शेती संबंधी व पशुवैद्यकीय विभागातील हलगर्जीपणाबाबत त्वरीत कार्यवाहीची मागणी

Image
खालापूरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वरद विनायक शेतकरी संस्थेकडून तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन       ई-पिक पाहणी, नुकसान भरपाई, फार्मर आयडी व पशुवैद्यकीय विभागातील हलगर्जीपणाबाबत त्वरीत कार्यवाहीची मागणी वावोशी / जतिन मोरे : खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध तातडीच्या प्रश्नांबाबत वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था, खालापूर तालुका – खानाव यांच्या माध्यमातून खालापूर तहसीलदार व गटविकास अधिकारी खालापूर यांना निवेदन देण्यात आले. ई-पिक पाहणी, फार्मर आयडी व नुकसानभरपाईचे प्रश्न ऐरणीवर या भेटीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीतील अडचणी, फार्मर आयडी न मिळणे, आंबा व भात पिकांच्या नुकसानीची भरपाई अशा प्रमुख मागण्यांवर चर्चा केली. याशिवाय पशुवैद्यकीय डॉक्टर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणींबाबतही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी त्वरीत उपाययोजना राबवाव्यात, अशी सामूहिक मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माजी सभापतींची उपस्थिती शेतकऱ्यांच्या न्याय मागणीला बळ देण्यासाठी र...

जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त ‘फिश रोग निदान व इको-फ्रेंडली तंत्रज्ञान’ विषयक प्रशिक्षण संपन्न

Image
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त ‘फिश रोग निदान व इको-फ्रेंडली तंत्रज्ञान’ विषयक प्रशिक्षण संपन्न आयसीएआर–सीआयएफटी मुंबई संशोधन केंद्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मत्स्यव्यवसायातील रोग प्रतिबंध, मूल्यवर्धन आणि पर्यायी ऊर्जा उपायांवर सखोल चर्चा नवी मुंबई | जतिन मोरे       जागतिक मत्स्यव्यवसाय दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयसीएआर–सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी (CIFT) मुंबई संशोधन केंद्रात "फिश रोग निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि इको-फ्रेंडली पोस्ट-हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण-सह-जागरूकता कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम NSPAD–PMMSY अंतर्गत आयसीएआर–CIFT नवी मुंबई व आयसीएआर–सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) वर्सोवा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.            या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता ‘रिपोर्ट फिश डिसीज’ अॅप नोंदणी व जनजागृती सत्राने झाली. श्री. साजन यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आयसीएआर गान सादर करण्यात आले. स्वागत भाषण डॉ....

‘देवदूत’ आशा सेविकेचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान

Image
‘देवदूत’ आशा सेविकेचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान; आरोग्य सेवेत मोलाची भूमिका; मानधनवाढीसाठी अधिवेशनात मुद्दा मांडणार वावोशी | जतिन मोरे        कर्जत–खालापूर मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य सेवेला आधार देणाऱ्या आणि जनतेच्या आरोग्याचे खरे प्रहरी ठरलेल्या आशा सेविकांचा दिवाळीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी प्रत्येक आशा सेविकेला मानधन व मिठाई देत दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.              कोरोना काळात आणि त्यानंतरच्या काळातही समाजाच्या आरोग्यासाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या आशा वर्कर्सच्या सेवाभाव व निष्ठेबद्दल आमदारांनी कृतज्ञता व्यक्त केली. “ग्रामीण भागात आरोग्य सेवेच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही देवदूतासारखे कार्य करत आहात. कठीण परिस्थितीतही सेवाभावाने काम करणाऱ्या आशा वर्कर्समुळेच सरकारची आरोग्य व्यवस्था सक्षम राहिली आहे,” असे आमदार थोरवे यांनी सांगितले. तसेच, आशा वर्कर्सना अत्यल्प मानधनावर काम करावे लागते, तरीही त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग...

वावोशी विद्यालयात पोलिसांकडून सायबर जनजागृती

Image
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहा; वावोशी विद्यालयात पोलिसांकडून सायबर जनजागृती        पोलीस अधिकारी संतोष आवटी यांनी दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले मार्गदर्शन; 50 पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित वावोशी | जतिन मोरे       सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने सायबर मास निमित्त श्री छत्रपती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, वावोशी (ता. खालापूर, जि. रायगड) येथे दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.            या कार्यक्रमात वावोशी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष आवटी व त्यांचा स्टाफ उपस्थित होता. त्यांनी 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना “सायबर गुन्हे आणि त्यापासून घ्यावयाची काळजी” या विषयावर दृकश्राव्य माध्यमातून (प्रोजेक्टरद्वारे) सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर फसवणूक, सोशल मीडियावरील जबाबदार वापर, ऑनलाइन व्यवहारातील सावधगिरी आणि वैयक्त...

७६ लाख २० हजार रुपयांच्या निधीतून गावाला मिळाला शिक्षणाचा नवा अध्याय

Image
हाळखुर्द गावातील १२० वर्ष जुनी उर्दू शाळेचे नूतनीकरण — आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न     ७६ लाख २० हजार रुपयांच्या निधीतून गावाला मिळाला शिक्षणाचा नवा अध्याय; आमदारांच्या प्रयत्नातून ऐतिहासिक शाळेला नवे जीवन खोपोली | जतिन मोरे      खालापूर तालुक्यातील हाळखुर्द गावात तब्बल 120 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाले. जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत ७६ लाख २० हजार रुपयांचा निधी आमदार थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला असून, या ऐतिहासिक शाळेला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे.         मुंबई–पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या हाळखुर्द गावातील जुनी शाळा जीर्ण अवस्थेत असल्याने तिच्या पुनर्बांधणीची गरज तीव्र होती. सामाजिक कार्यकर्ते हुसेन खान, ग्रामपंचायत उपसरपंच अजीम मांडलेकर आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन आमदार थोरवे यांच्याकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ही मागणी...

ओलमन ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

Image
ओलमन ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश     आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांचा 'बाळासाहेब भवन' येथे प्रवेश सोहळा संपन्न वावोशी | जतिन मोरे     आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर दृढ विश्वास व्यक्त करत ओलमन ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.           या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विनोद पादिर, सुदाम हिंदोळा, संतोष पादिर, किरण ठोंबरे, धर्मा नीरगुडा, भागा हिंदोळा, कुमार पादिर, मारुती पादिर, अजित वाघ, भूषण पुंजरा, रवी हिंदोळा, राजेश पादिर, रोहित पादिर, मनीष पारधी, रमेश पादिर, रोहन ठोंबरे, राज मेंगाळ, नीरज पादिर या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या प्रसंगी बोलताना नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “शिवसेनेत कधीही नवा-जुना असा भेदभाव केला जात नाही...